स्थळ : मंगल
कार्यालय कांचनवाडी
दुपारी जेवानाच्या सुट्टीत एका
विद्यार्थिनीच्या लग्नाला जायचा योग आला. लग्न झाल्यावर बाहेर पडताना
विद्यार्थिनीचा भाऊ पाठीमागून धावत पळत आला, जो आमच्याकडे सध्या आठवीत शिकतो आहे. खूप
छान पेहराव-फेटा असा सुटाबुटात दिसला. वाटलं... सर जेवला काय वगैरे विचारेल. पण
त्यानं पहिला प्रश्न विचारला , “ सर, आज गणिताची टेस्ट घेतलीत तुम्ही?” मी म्हंटलं,
“हो...”. त्याचा चेहरा थोडा उतरला. कारण दीदीच्या लग्नामुळे त्याला टेस्ट चुकवावी
लागली होती. त्याने थोडं निराशेनच विचारलं , “माझी टेस्ट उद्या घेणार का सर?” मी
म्हंटलं , “अरे का नाही... उद्या नक्की तुझी टेस्ट घेतो, काळजी करू नको.” असं
म्हणाल्यावर त्याचा चेहरा खुलला व परत लग्नकार्यात जाऊन मग्न झाला.
एवढ्या मोठ्या लग्नसमारंभात गणिताची
टेस्ट लक्षात ठेऊन त्याची चौकशी करणारा, टेस्ट चुकल्याबद्दल नाराज होणारा
विद्यार्थी विरळाच...
शब्दांकन : विशाल
पोतदार, माध्यमिक विद्यालय चाफोडी.
No comments:
Post a Comment